आज सकाळी दहाच्या सुमारास ग्रीड फेल्युअरमुळे मुंबई-ठाणे येथील बहुतांश भागात वीज गेली आहे. त्यामुळे नागरिकांना- विद्यार्थ्यांना आणि रुग्णालयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. आॅनलाईन शिक्षण सुरु असल्याने विद्यार्थांना वीजेअभावी बसून रहावे लागत आहे. दरम्यान, हे पूर्णपणे ठाकरे सरकारचे अपयश असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर हा वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत होईल, असा दावा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.