संपूर्ण गावाला सळो की पळो करून सोडणा-या तांदूळवाडी येथील वानराच्या टोळीस पकडण्यास आज मोठ्या प्रयत्नाने यश आले. सिल्लोड येथील समाधान गिरी आणि त्यांच्या सहका-यांनी तब्बल ५४ वानरे पिंज-यात बंद केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला .