#RamdasKadam #Shivsena #MaharashtraTimes
आमदार म्हणून रामदास कदम यांचा शेवटचा दिवस होता. यावेळी निवृत्तीच्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल आणि शिवसेनेबद्दल भावना मांडल्या. पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी योग्य रितीने पार पाडली. माझा मुलगा आमदार आहे, कुठलंही दु:ख माझ्या मनात नाही. असं बोलताना निरोप भाषणावेळी रामदास कदम विधान परिषदेत भावूक झाले. महाराष्ट्राच्या हितासाठी या सभागृहात लढलो झगडलो, कधी आक्रमक तर कधी मवाळ असे माझे अनेक रूप या सभागृहाने अनुभवले. पण याचवेळी पत्ता कट झाला असं अनेक जण बोलत असतात, त्यावर रामदास कदम नेमकं काय म्हणाले पाहा....