महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? यंदा मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता असून केरळमध्येही उशिराने आगमन होऊ शकते. यामागे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात अनुकूल वातावरणाची कमतरता हे प्रमुख कारण आहे.
विदर्भ आणि cxoच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे ४० अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवले जात आहे. या उष्णतेबरोबरच काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत. काही ठिकाणी तीव्र उष्णता असेल, तर काही ठिकाणी वादळी पावसासह दिलासा मिळू शकेल. नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा आणखी काही दिवस करावी लागणार आहे.
#मान्सून #महाराष्ट्र | #हवामान | #पाऊस