कोल्हापूर - लोकसभेतील भाजपाचे संख्याबळ वाढवण्यासाठी प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे कारस्थान भारतीय जनता पार्टी करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यातील सहा खासदार आज नवी दिल्लीत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटले आणि त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी पत्र दिलं यानंतर राज्यात 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार गेलं होतं. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र राज्यातील कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी अडचणीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावं उद्याचा काळ हा आपलाच असेल तेव्हा आज सत्तेसाठी लाचार झालेल्या नेत्यांचे परतीचे दोर कापले गेले असतील शिवसैनिकांनी संयम ठेवत ठाकरे यांच्या सोबत राहावं असं आवाहन उपनेते संजय पवार यांनी केलं. त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी महेश कांबळे यांनी.