मुंबई : नुकतेच एकनाथ शिंदे यांचे ऑपर" /> मुंबई : नुकतेच एकनाथ शिंदे यांचे ऑपर"/>
मुंबई : नुकतेच एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (उबाठा) सहा फुटीर खासदारांचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे. या ऑपरेशन टायगरनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार फुटणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी "ईटीव्ही भारत"शी संवाद साधला. यावेळी, "काहीही झालं तरी आमच्या पक्षातला एकही खासदार साथ सोडणार नाही, " असं बजरंग सोनवणे यांनी सांगितलं.
बजरंग सोनवणे म्हणाले की, "आमच्या पक्षातला एकही खासदार फुटणार नाही, याचा मला विश्वास आहे. मीच काय माझे सहकारी सात खासदार देखील फुटणार नाहीत. याची मी ग्वाही देऊ शकतो. इतर पक्षातील कोणते खासदार फुटले किंवा कोणते खासदार फुटले नाहीत, याविषयी मला भाष्य करायचं नाही. मात्र माझ्या पक्षाविषयी मला खात्री आहे. आम्ही सर्व पवार साहेबांवर प्रेम करणारे आठ खासदार आहोत. तसंच आजची वेळ, आताचे ठिकाणही लिहून घ्या, कारण माझ्या पक्षातला एकही खासदार फुटणार नाही, हा मला विश्वास आहे. यावर मी ठाम आहे. याचबरोबर, राजकारणामध्ये निधी हे सर्वस्व नसतं. निधी मिळत नसेल तरीदेखील आपण खासदार म्हणून आपलं काम करू शकतो," असं बजरंग सोनवणे म्हणाले.
दरम्यान, मराठवाड्यामध्ये पाऊस नसल्यामुळं शेतकऱ्यांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. याबाबत बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, "मराठवाड्यात पाण्याची समस्या मोठी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी देखील नागरिकांचे हाल होत आहे. शेतकरी देखील पाऊस नसल्यामुळं बेहाल आहे. मात्र, ज्या प्रकारचे काम किंबहुना नियोजन हे पाण्याविषयी मराठवाड्यामध्ये व्हायला पाहिजे, तसं होत नाहीये. "हम करे सो कायदा" अशा प्रकारचे काम सध्या मराठवाड्यामध्ये सुरू आहे. कालवा समितीच्या बैठका देखील व्यवस्थित होत नाहीत."