Surprise Me!

‘Deool Band 2’ शेतकऱ्यांवरच करायचा हे कसं ठरलं? Pravin Tarde यांनी सांगितलं महत्वाचं कारण...

2026-07-14 4 Dailymotion

स्वामी समर्थांचे विचार आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विदारक वास्तवावर भाष्य करणाऱ्या प्रवीण तरडे लिखित - दिग्दर्शित 'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाने तब्बल १०० कोटींचा टप्पा पार करत इतिहास रचला आहे. या अभूतपूर्व यशाचं खास सेलिब्रेशनही सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत जल्लोषात व उत्साहात नुकतंच पार पडलं. पण या यशामागची खरी गोष्ट तुम्हाला माहित आहे का? प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २'ची कथा शेतकऱ्यांभोवतीच का गुंफली? त्यामागे नेमका कोणता विचार दडला आहे? या प्रश्नाचं उत्तर स्वतः प्रवीण तरडे यांनी 'लोकमत फिल्मी'च्या मुलाखतीत दिलं होतं.

#pravintarde #deoolband2 #mohanjoshi #lokmatfilmy #marathientertainmentnews #deoolband