Mohan Bhagwat on Genz भारताची तुलना इतर देशांशी नको; जगाला दिशा देण्याची जबाबदारी आपली ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून ‘जेन-झी’ला डॉ. मोहन भागवत यांनी हा संदेश दिला. नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर २०० फुटी तिरंग्याचे ध्वजारोहण मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक पिढ्यांनी स्वतःच्या हिताचा त्याग केला, बलिदान दिले आणि देशासाठी काम केले. त्यामुळे आज आपण भविष्याचा विचार करू शकत आहोत, असे डॉ. भागवत म्हणाले. तरुण पिढी ही देशाची ‘डेमोक्रॅटिक डिव्हिडंट’ आहे. तिचा योग्य उपयोग केला तर भारत विश्वगुरू बनू शकतो; अन्यथा हीच मोठी लोकसंख्या भविष्यात ओझे ठरू शकते. त्यामुळे तरुणांनी केवळ स्वतःच्या भविष्याचा विचार न करता पुढील पिढी आणि देशाच्या भवितव्याचा विचार करावा, असे त्यांनी सांगितले.
#MohanBhagwat #genz #marathinews #maharashtranews